सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या सा-याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी *"संजीवन समाधी"* घेतलेली आहे. सामान्यत: लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात. वस्तुत: संजीवन समाधी ही जिवंत समाधी पेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो. परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथसंप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरुकृपेने ज्ञात असली तरी, श्रीभगवंतांच्याच आज्ञेने या जगात केवळ श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतलेली आहे. सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माउलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे, अस...
वारकरी मंच चे जेष्ठ सदस्य, मार्गदर्शक चिंचवड पुणे येथील श्रीविष्णूसहस्रनाम साधक श्री. दिलीप तांबोळकर काका हे उत्तम शंखवादक आहेत. चिंचवड च्या प्रत्येक सामूहिक उपासनेला ते अगत्याने उपस्थित असतात. त्यांनी केलेल्या मंगल व पवित्र शंखवादनानेच प्रत्येक उपासनेचा आरंभ होत असतो. सर्व साधकांना एकत्र बांधून ठेवण्यात शंखनादाचा महत्त्वाचा वाटा असतो आणि हे काम उत्तमरित्या दिलीपकाका पार पाडतात. आज तांबोळकर काकांच्या पत्नीची तिथ ! आपल्या पत्नीची आठवण येणार आणि त्या आठवणी साठवणीत राहुन दुःख होऊन मन दुर्बल होणारच परंतु कधीकधी या आठवणी नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देऊन जातात याचा प्रत्यय आज काकांच्या कृतीतून आला. एवढ्या निराशाजनक परिस्थिती असताना आपण सकारात्मक राहणे व त्यातही वैयक्तिक दुःखाने खचून न जाता मनाची उभारी धरुन जमेल तसं सामाजिक कार्यात काका नेहमीच हातभार लावत असतात. त्यांच्या सौभाग्यवती पण नेहमी राम मंदिरात श्रीविष्णूसहस्रनाम उपासनेला आवर्जून येत असत. आपल्या प्रिय व्यक्तीला जे प्रिय होते तेच जर आपण अंशतः करु शकलो तर आपल्या मनाला अधिक समाधान लाभते. कारण आपली प्रिय व्यक्ती ...
मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_ या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे. _*मृत्यू कधी येतो ?*_ मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो. या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरुंच्या क...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा