मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_ या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे. _*मृत्यू कधी येतो ?*_ मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो. या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरुंच्या क...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा