हिंदू लग्न पध्दती. By- Nilesh Konde-Deshmukh

 

१) लग्नात मांडव कशासाठी ???
= मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !!!

२) विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???
= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !!!

३) नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???
=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !!!

४) मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???
= मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !!!

५) लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???
= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नाही  हे सांगण्यासाठी !!!

६) लग्नात सप्तपदी माहित आहे का कशासाठी???
= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !

७) लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???
= तांदूळ ची अक्षता याच्या साठी की तांदूळ चे बीज लावताना आपण एक जागी लावतो ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो तसेच मुलींचे बालपण माहेरी असते त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते तिथेच त्यांचा वंश वाढतो, याची आठवण रहावी म्हणून लग्नात तांदुळाच्या अक्षता टाकतात पण हे शास्त्र बऱ्याच लोकांना माहीत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh