कर्म सिद्धांत. By-Nilesh Konde-Deshmukh

 #कर्माचा_सिद्धांत


कोणाची ही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परीनाम भोगावे लागतात.


काही लोकांना नाही पटणार हा विषय, 

पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, ....


अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ...


जसे की शारिरीक, मानसिक, आर्थिक,.....

अपमानास्पद वागणुक,...

कोणांचे मन दुखावले असू शकते....,कोणावर अन्याय केला गेलेला असतो, .....

कोणाची सामाजिक बदनामी केलेली असते,.....

छळ केलेला असेल, शारिरीक दुखापत केलेली असेल, .......

किंवा प्रेमात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ......

त्रासाचे कुठलेही कारण असो...


वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकतो, 

जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, 


 पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही,किंवा देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमधे शोषली जाते,मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळटळाट अस म्हटले जाते,


मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही, सतत अपयश येणे घरात आजारपण येणे काही ही घटणा घडू शकतात,....


आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे जगात फक्त दोनच व्यक्तिंना माहित असते,एक म्हणजे 


"आंतरात्मा"


दुसरा 


"परमात्मा"


समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परत फेड याच जन्मात करावी लागते, 


 तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा अगर नका ठेऊ तुम्ही अस्तिक असा किंवा नास्तिक,


 चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,


मी ऐका पुस्तकात वाचले होते,


राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले,

तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?

 माझ्या संबंध जिवनात मी असे कोणते ही महान पातक केलेलं नाही,

की ज्याच्या परीनाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुखः सोसणे माझ्या नशिबी यावे? 


तुव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व जन्म पाहाण्याची दिव्य दृष्टि दिली, 


धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो ऐक पारधी होता, आणी पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगिची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षाची शंभरएक लाहान पिल्ले उडू न शकल्याने आगित होरपळून मृत्युमुखी पडली, धृतराष्ट्र राजाची त्या वेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले, 


कर्म हे फल देऊनच शांत होते,


प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, 

हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे, 

चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणी काळ पुढे माघे होऊ शकतो,

हाच कर्माचा सिद्धांत आहे,


आता आपण ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे, 


"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 


क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट"

संकलन : वारकरी मंच

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh