पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जेंव्हा तुम्ही पुस्तके वाचता. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
जेंव्हा तुम्ही पुस्तके वाचता. By-Nilesh Konde-Deshmukh. 📚 भिकाऱ्यात पण माणूसपण दिसायला लागते. 📚 चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते. 📚 प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो. 📚 एखाद्याची चूक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते. 📚 कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलू नये हे कळते. 📚 चाकू, बंदुक यांच्या पेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते. 📚 आई वडीलांची किंमत कळायला लागते. 📚 ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण, या गोष्टी म्हणजे पूर्ण जीवन संपले हा गैरसमज दूर होतो. 📚 या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात. 📚 प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते. 📚 सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते. 📚 कलाकार चित्रपटात नि नाटकात काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खूप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते. 📚 या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत. राहिलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत. काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट ह

चांगले पुण्यकर्म करत राहा.By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
चांगले पुण्यकर्म करत राहा. By-Nilesh Konde-Deshmukh. (गोष्ट तशी काल्पनिक आहे परंतु पुण्य कर्मावर आधारित आहे) एक राजाला चार राण्या होत्या, पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा? ❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा! ❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ? ❕चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!! ❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, "मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?" ❕राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे. ❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, "मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही. ❕राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, "तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ? ❕तिसरी राणी म्हणाली, "मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही. ❕आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे प

संजीवन समाधी म्हणजे नेमके काय. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या सा-याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म  अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी *"संजीवन समाधी"* घेतलेली आहे. सामान्यत: लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात. वस्तुत: संजीवन समाधी ही जिवंत समाधी पेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो. परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथसंप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरुकृपेने ज्ञात असली तरी, श्रीभगवंतांच्याच आज्ञेने या जगात केवळ श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतलेली आहे. सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माउलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे, अस

चला माणूस बनू या.By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते.  ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता....       हेच ते प्रेत जिवंत असताना माझेमाझे करत असेल, एक एक रुपयासाठी झगडत असेल, मोह - माया - काम - क्रोध - मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह , आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय.. जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव  लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासून स्मशानभूमी पर्यंतच सोबती झाले-खरे; परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासून पोटभर अन्न खातील ते. जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात १०० एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशानभूमीतील एकाकी घाटावर, अलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाथरूम, तरीही शेवटची आंघोळ ही त्यात नव्हती, तर ती होती फक्त आणि फक्त घरा समोरील रस्त्यावर आयुष्यभर ज्या साठी झगडला, त्यातील एक गोष्ट सुध्दा बरोबर नव्हती. जळताना - ना प्रेम करणारे जिव