पोस्ट्स

मागणीचे डिपॉजीट

*👏🏻देवाकडे काय मागावं👏🏻* तुकारामांचे वडील बोल्होबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते... ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असंत... आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या... पण बोल्होबा काही तिचे ऐकत नसंत... अशी अकरा वर्षे गेली. बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेचना. ती आपल्या पतीला म्हणाली की... "जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच." बोल्होबांचा नाईलाज झाला कारण स्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ना..!! ते म्हणाले... " मी तुला माझ्या बरोबर नेईन पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदीरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही" कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगीतले की मी काही मागणार नाही. पती पत्नी पंढरपुरास निघाले..  तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू..!! यात्रतेतली बांगड्याची, खेळण्य

आपल्यांची वेळीच टकटक ऐकायला शिका. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
{ लहानपनी   अर्धि   राहिलेली गोष्ट }👌👌 चिमणीचे सगळे काम आटोपले ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की,  अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही.  तिला विलक्षण अपराधी वाटलं.  तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती.  ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. 'गेला असेल कुठेतरी... येईल परत'  …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली.  मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता.  चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही …  कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची ……  तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं...  अनेक दिवस उलटले ... चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना.  मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच

उपजे ते नाशे

मृत्यू का येतो ,, ?                             जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे.                        _*संत ज्ञानेश्वर*_ या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा  नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या,  होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह  निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.                    _*मृत्यू कधी येतो ?*_ मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो. या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास  सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला  एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही.  सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले  प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी  आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही. हिं

विश्वास

*Belief (विश्वास) आणि Trust (विश्वास)* दोन्ही शब्दांचा अर्थ "विश्वासच" आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात अंतर आहे. एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबल वरून या इमारती वरून त्या इमारतीवर  जात होता. त्याच्या  खांद्यावर  त्याचा लहान मुलगा होता. दोन इमारतींच्या मधे हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती.  हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून  त्याने ते अंतर पूर्ण केलं. जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या. तोंड फाडून कौतुक केले. तो इमारतीच्या खाली लोकांमधे आला. लोक त्याच्या बरोबर फोटो. सेल्फी  काढू लागले. त्याचं अभिनंदन  करू लागले.  तो डोंबारी सगळ्यांना  उद्देशुन म्हणाला  "मला हे पून्हा एकदा करावसं वाटतं. तूम्हाला विश्वास वाटतो का मी हे पून्हा करू शकेन?" सगळी माणसं एक आवाजात म्हणाली "हो, तू हे परत एकदा नक्कीच  करू शकतोस." डोंबारी म्हणाला "तूम्हाला विश्वास आहे मी हे करू शकेन?" पुन्हा सगळे ओरडले &quo

निरपेक्ष व निस्वार्थ प्रेम फक्त माताच करु जाणे. By-Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
👉आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने मुलाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, "बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे ?  👉तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं.. काय काय नाही केलं. स्वत:च जगणंच विसरले मी."  👉 मुलगा म्हणाला, "आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."  👉 आई स्मितहास्य करीत म्हणाली, " अरे वेडया ! हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन हो ! तू जेव्हां खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."  👉 मुलगा म्हणाला, "बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर "  👉 आई आता हसली म्हणाली, "सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न करावं ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम

कर्म सिद्धांत. By-Nilesh Konde-Deshmukh

 #कर्माचा_सिद्धांत कोणाची ही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परीनाम भोगावे लागतात. काही लोकांना नाही पटणार हा विषय,  पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, .... अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ... जसे की शारिरीक, मानसिक, आर्थिक,..... अपमानास्पद वागणुक,... कोणांचे मन दुखावले असू शकते....,कोणावर अन्याय केला गेलेला असतो, ..... कोणाची सामाजिक बदनामी केलेली असते,..... छळ केलेला असेल, शारिरीक दुखापत केलेली असेल, ....... किंवा प्रेमात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ...... त्रासाचे कुठलेही कारण असो... वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकतो,  जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल,   पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही,किंवा देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमधे शोषली जाते,मग समोरच्या व्यक्तीला हाय ल

स्वस्तिक चिन्हाचे महत्व . By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  स्वस्तिक दरवाजावर असल्याने वाईट शक्तींचे आपल्या घरात प्रवेश होत नाही परिणामी आपल्या घरात सुख शांती समाधान नांदते. ‼️ हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या स्वस्तिक चिन्हाविषयी  माहिती.‼️ १. स्वस्तिक हे कशाचे प्रतिक आहे ? = समृद्धी, मांगल्य,शांती २. ते कोणत्या बोटाने काढावे ? = अनामिका ३. या चिन्हाचा जीवनातील अर्थ = कल्याण असो ४. यामुळे जीवन कसे रहाते ? = गतिमान ? ५. कोणत्या देवतेचे साकार रूप आहे ? = श्रीगणेश ६. कोणत्या देवतेचे आसन मानले आहे ? = सूर्य ७. यातील उभी रेघ काय दर्शविते ? = विश्वाच्या उत्पत्तीचे कारण ८. आडवी रेघ काय दर्शविते ? = विश्वाचा विस्तार ९. चार भुजा कशाचे प्रतिक आहेत ? = धर्म,अर्थ,काम व मोक्ष १०. चार भुजांवर स्थित गुण कोणते ? = आशीर्वाद,कल्याण,प्रीती व सौंदर्य ११. डाव्या व उजव्या बाजूच्या रेघा कशाचे प्रतिक आहेत ? = शुभलाभ,रिद्धीसिद्धी १२. कोणत्या बिंदूपासून काढतात ? = मध्यबिंदूपासून १३. चार ठिपके म्हणजे या चार देवता होत.. = गौरी,पृथ्वी,कूर्म,अनंत १४. स्वस्तिकातील कल्याण भावना कोणती ? = वसुधैव कुटुंबकम् १५. शुभ म्हणून कोठे काढतात ? = मंदिर,घराचे मुख्यद्वार, अंतरपाट १६. घरच्

भगवद्गीता का वाचावी? By- Nilesh Konde-Deshmukh

 ------------------------------------------------ *"भगवद्गीता "*  *का वाचावी याची १८ कारणे  _" विज्ञान म्हणते कुठलीही गोष्ट पूर्ण समजून घेतल्याशिवय त्याचा निष्कर्ष काढू नये "_  *म्हणुन जरूर ऐकदा तरी भगवतगीता वाचा...* भगवतगीता वाचताना अर्जुन आपण स्वता आहोत व तो जे प्रश्न विचारतो ते आपण विचारतो आहोत्त असे समजावे.. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे जरूर मिळतील. *कारने (अध्ययानुसार)* *१) अर्जुनविषादयोग-* यामधे तूमचे जेवढे प्रश्न असतील यामधे असतील . तसेच आपले मन आपल्या ताब्यात नसते . द्विविधा मनस्थिति, राग, एकाद्या गोष्टीचा मोह अश्या परिस्थितीत आपले मन जशी प्रतिक्रिया देते ते या अध्ययात आहे. *२) सांख्ययोग -*  यामधे आपले शरीर व आत्मा या दोघांमधे काय अंतर आहे आत्मा हा अमर आहे व शरीर (मन/बुद्धि) कोणतीही घटना घड़ताना कशी टप्या टप्या प्रतिक्रिया देते याचे वीस्तृत वर्णन यामधे केले आहे. *३) कर्मयोग -* प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म ( काम ) करावेच लागते.काही करने व काहीही न करने हेही १ कर्म (काम) च आहे. जे आपल्या हातात आहे . तसेच इन्द्रिय ,मन व बुद्धि यांचा परस्पर कसा समंध

शनिवारी पिंपळाच्या झाडाची पुजा का करावी. By - Nilesh Konde-Deshmukh

 शनिवारी का केली जाते* *पिंपळाच्या झाडाची पूजा?* भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे. पिंपळाचे झाड प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे. पिंपळाचे झाड प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे. असे मानले जाते की, पिंपळाच्या झाडाचे दर्शन-पूजन केल्याने दीर्घायुष आणि समृद्धी प्राप्त होते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, शनिवारी पिंपळाच्या झाडाचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व का आहे?  धार्मिक मान्यतेनुसार, शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. या दिवशी पिंपळाचे पूजन आणि या झाडाला सात प्रदक्षिणा घातल्याने शनि पिडा दूर होते. आयुर्वेदामध्ये पिंपळाचे झाड औषधी गुणांनी भरलेले असल्याचे सांगितले आहे.  शनि अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. श्रावण महिन्यात अमावस्या झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते. पिंपळाचे झाड ब्रह्मस्थान असून यामुळे सात्वि

लढवय्या महिलांच्या जिद्दीला सलाम. By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  'अलिसीया मोंटानो' ह्या महिलेने इतिहास घडवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'साडेआठ महिने' प्रेग्नन्ट असलेल्या या अमेरिकन धावपटूने 800मी ची शर्यत 2 मिनिटे आणि 32.13 सेकंदात पूर्ण केली. पाच वेळा नॅशनल चॅम्पियन राहिलेली अलीसिया ह्या शर्यतीत तिच्या वैयक्तिक सर्वोच्च (मोनॅको) रेकॉर्ड पेक्षा फक्त 35 सेकंद हळू धावली. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, "प्रेग्नन्ट असताना मी पहिल्या महिन्यापासून धावण्याचा सराव करते आहे. प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम फार महत्वाचा असतो. मला धावताना मजा वाटते. फिटनेस वाटतो. त्यामुळे चौतीस आठवडे प्रेग्नन्ट असूनही मला विशेष त्रास झाला नाही. ह्याही वेळी मजाच आली." स्पर्धेत ती बाकीच्या स्पर्धकांच्या मागे पडली नाही. पहिल्या लॅपपासूनच ती वेगाने धावत होती. तिने पहिला लॅप पूर्ण केल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्या पडू लागल्या आणि तिने शर्यत पूर्ण करेपर्यंत टाळ्या वाजतच राहिल्या.  हे सर्व अलीसियाने अगदी विचारपूर्वक केलं. ती माध्यमांना सांगते, "मला आधी काळजी वाटत होती. पण जेव्हा डॉक्टर म्हणाले की मी ही स्पर्धा धावू शकेल. डॉक्टरांनी मला थांबवलं नाही, उलट स्प