पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गाथा अभंग क्र.२४ By Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
नामसंकिर्तन ह्या एकाच साधनाने जन व वन विठ्ठलरूप झाले आहेत. जिकडे पाहावे तिकडे मायबाप विठ्ठलरखुमाई आहेत असेच माझ्या अनुभवला येत आहे. त्यामुळे अरण्य आणि नगर यांना एकरूपता आली आहे. एवढेच काय पण सर्व स्थाने आम्हाला पूज्य झाली आहेत. जगतगुरु तुकोबाराया म्हणतात  आता माझ्या चित्तात संसारातील सुख दुःखाना वाव नाही म्हणून मी नाम संकीर्तनाच्या आनंदाने नाचतो उडतो. ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर. मो.नं.९८९००१३५२०

स्वार्थीपणा एकत्र कुटुंब पद्धती साठी हानिकारक. - By Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
भारतीय संस्कृती खूप मजबूत आहे त्याचबरोबर भारतीय संस्कृती प्राचीन आहे. खरंतर ही संस्कृती टिकवण्याचा मजबूत आणि योग्य असा एकमेव मार्ग म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होय असं मला वाटतं. परंतु आधुनिक युगामध्ये विभक्त कुटुंब पद्धती उदयास येऊन खरंतर या संस्कृतीला सुरुंग लावण्याचे काम नवा विचाराने झाल्याचे आपल्यास पाहायला मिळते. प्रस्तुत लेखात आपण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे होनारे नुसकान, कुटुंबाची होणारी वाताहत, त्यातून त्या घरातील लहान मुलांच्या बालमनावर होणारे परिणाम, आपल्याच नात्यांसोबत होणारे कटू संबंध, विभक्त होण्याची कारणे आणि आपल्यातीलच काही लोकांनी घरफोडी वृत्तीला दिलेला थारा या सर्व गोष्टींमुळे समाजामध्ये आपली पत ढासळुन आपण आर्थिक व वैचारिक दृष्ट्या अधोगतीला जाण्याची कारणे थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. घर खरच कोणामुळे फुटते..? बहूतेकवेळा याचे खापर स्त्रियांच्या माथी मारले जाते. कोणाचेही घर स्त्रिमुळे फुटत नाही तर ते स्वार्थामुळे फुटत असते, मग तो कुटुंबातील स्त्री, पुरूष कोणातही निर्माण होऊ द्यात. मनात स्वार्थ निर्माण झाला की त्याला फक्त समर्थनाची गरज असते, मग पतीला समर्थन देणे हे

ब्राम्हण तो बहाना है - By Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
Skip to content ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख. वारकरी मंच.  MENU ब्राम्हण तो बहाना है असल मे हिंदू धर्म को मिटना है..! #B5 Posted on  August 29, 2018  by  ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर. हा   लेख   वाचून सर्वच ब्राह्मणांवर टीका करणाऱ्या जातीयवादी मंडळींच्या डोक्यात प्रकाश पडेल हि अपेक्षा आहे. जसे मुस्लिम धर्मामध्ये मौलाना, ख्रिश्चन धर्मामध्ये फादर, बौद्ध धर्मामध्ये बौद्ध भिक्षुक तसेच आमच्या सनातन म्हणजे हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण कोणाला काही अडचण? बहुजनवादी फुले-शाहू-आंबेडकर यांचे ब्राह्मण प्रेम. आजकाल बर्याच जणांना ब्राह्मण द्वेष करताना जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आधार घेण्याची गरज वाटू लागली आहे. या प्रभूतींनी ब्राह्मणांना विरोध केला हे जरी खरे असले तरी त्यांनी सरसकट सर्वच ब्राह्मणांना विरोध केला नाही, कित्येक ब्राह्मणांची मदत त्यांनी घेतली होती. परंतु आजच्या यांच्या काही अनुयायांना मात्र हे खरे वाटत नाही. त्यांनी हे वाचलेच पाहिजे. महात्मा जोतीबा फुले – १) जोतिबांचे प्राथमिक शिक्षण हे पंतोजींच्या शाळेत झाले होते, तसेच त्यांचे कितीतरी मित्

गाथा अभंग निरुपण By Nilesh Konde-Deshmukh

इमेज
जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय. अर्थ. या जगात कोणी आमची निंदा करून आम्हाला मारो अथवा कोणी आमची स्तुती / वंदन / नमस्कार करून आमची पूजा करोत, आम्हाला त्याचे सुख ही नाही दुःखही नाही. मी सुख दुःख पासून वेगळा आंनदरूप आहे. या दोन्ही पासून लांब अलिप्त आहे. प्रारब्धभोगाप्रमाने सुख दुःखे प्राप्त होतात, त्याचा समत्वभावाने स्वीकार करावा. जगतगुरु तुकोबाराया म्हणतात  आमच्या हृदयात आता सुख दुखाना जागाच नाही. होणारी सुख दुःखे माझी आहेत अ से न मानता ती सर्वव्यापक जनार्दन नारायणाला प्राप्त होतात असे मी मानतो. म्हणजेच जी कांही दुःख सुख होतात ती आपली म्हटले तर ते जाणवणार जर आपण ती आपली नाहीच असे जर मानून जगलो तर त्याचा काहीच परिणाम होणारच नाही तर ती नारायणाच्या ठिकाणी लय पावतात. ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर मो.नं.९८९००१३५२०

मंत्र पुष्पांजली बद्दल थोडं जाणुन घेऊया.- ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर.मो.नं.९८९००१३५२०

इमेज
♦️मंत्रपुष्पांजली♦️ खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन. mantrapushpanjali मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे- या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकाचा अर्थ खालीलप्रमाणेः श्लोक – १ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन् तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव: श्लोकाचा अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले. श्लोक २ ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्

सर्वांना विनंती आहे. कृपया जिथे शक्य होईल तिथं वृक्षारोपण करा.- ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर.

इमेज
लेख अवश्य वाचावा मो.नं.९८९००१३५२० झाडे लावा झाडे जगवा.🌴🌴🌲🌲 😇स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे. अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम् न्यग्रोधमेकम् दश चिञ्चिणीकान् । कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।। अश्वत्थः = पींपल पिचुमन्दः = कडूनिंब न्यग्रोधः = वट वृक्ष चिञ्चिणी = चिंच कपित्थः = कवठ बिल्वः = बेल आमलकः = आवळा आम्रः = आंबा(उप्ति = झाडे लावणे) जो कोणी या झाडांची लागवड करेल ,त्यांची निगा राखेल त्याला नरकाचे दर्शन होत नाही. हे न अनुसरल्यामुळे आपल्याला दुष्काळ स्वरूपात नरकाचे दर्शन घडते आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आता तरी चुका सुधारू. गुलमोहर निलगिरी सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत. तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करू.🌱🌱🌳🌳 दुष्काळाचे खरे कारण पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने हो आपल्याला विचित्र वाटेल, परंतु हे सत्य आहे. (पिंपळ कार्बन डायऑक्साइड १००% शोष