पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैवाहिक जीवन बळकट करण्यासाठी मंत्र. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
🔴वैवाहिक जीवन बळकट नसण्याची कारणे. वैवाहिक जीवन बळकट करण्यासाठी काही लहान -लहान गोष्टींना लक्षात घेणं आवश्यक असतं.    सध्याच्या आधुनिक काळात शुल्लक कारणांवरून वितंडवाद होतो आणि तो घटस्फोटावर जाऊन थांबतो. वैवाहिक जीवनात कोणत्या गोष्टींची काळजी न घेतल्यानं नात्यात दुरावा वाढतो. 🔴 संवादाचा अभाव. 👉 वैवाहिक जीवनात संवादाच्या अभावामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो. नवरा-बायकोमध्ये संवादाचा अभाव नसावा. नात्यात संवादाच्या अभावामुळे नातं कमकुवत होऊ लागतं. जर का आपणास आपल्या नात्याला अधिक घट्ट करावयाचे असल्यास संवादाचा अभाव होऊ देऊ नका. एकमेकांशी मन मोकळं करून संवाद साधा. 🔴गोष्टी सामायिक न केल्यानं. 👉 वैवाहिक जीवनात एकमेकांशी गोष्टी सामायिक न केल्यानं देखील नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा वाढतो. आपल्या वैवाहिक जीवनाला बळकट करण्यासाठी नवरा-बायकोने एकमेकांशी सर्व गोष्टी सामायिक कराव्यात. यामुळे आपापसातील संवाद वाढतो आणि सर्व गोष्टींना सामायिक केल्यानं नातं घट्ट होतं. 🔴 राग केल्यानं. 👉 वैवाहिक जीवनात रुसवे-फुगवे तर होतातच, त्याशिवाय त्याला रस येत नाही. पण जर का हा राग किंवा रुसवे-फुगवे विकोपाला गे

लहान मुलांना घडविताना हे करा. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
🔴1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावावी. 🔴2. घरात आदळआपट मुलांसमोर  करू नका. 🔴3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल बोला. 🔴4. मुलांना घालून पाडून बोलू नका, मूल तुम्हाला avoide करेल. 🔴5. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले कि तुम्ही बदलू शकता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा. 🔴6. मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा. 🔴7. आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे. 🔴8. मूल हि investors नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका. 🔴9. मुलांदेखत कुठलंहि व्यसन करू नका. 🔴10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी ! Process समजून सांगा. 🔴11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा. 🔴12. आपल्या मुलांची गरज समजून घ्या. 🔴13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा/बाप म्हणून या. 🔴14. मुलांना कधीही नाकारात्मक बोलायचं नाही, नालायका, गधडा वगैर सारखे शब्द वापरून नये. 🔴15. मुलांना आपण

श्री दिलीप तांबोळकर काका साधकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.By-Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
वारकरी मंच चे जेष्ठ सदस्य, मार्गदर्शक  चिंचवड पुणे येथील श्रीविष्णूसहस्रनाम साधक श्री. दिलीप तांबोळकर काका हे उत्तम शंखवादक आहेत. चिंचवड च्या प्रत्येक सामूहिक उपासनेला ते अगत्याने उपस्थित असतात. त्यांनी केलेल्या मंगल व पवित्र शंखवादनानेच प्रत्येक उपासनेचा आरंभ होत असतो.  सर्व साधकांना एकत्र बांधून ठेवण्यात शंखनादाचा महत्त्वाचा वाटा असतो आणि हे काम उत्तमरित्या दिलीपकाका पार पाडतात.  आज तांबोळकर काकांच्या पत्नीची तिथ ! आपल्या पत्नीची आठवण येणार आणि त्या आठवणी साठवणीत राहुन दुःख होऊन मन दुर्बल होणारच परंतु कधीकधी या आठवणी नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देऊन जातात याचा प्रत्यय आज काकांच्या कृतीतून आला. एवढ्या निराशाजनक परिस्थिती असताना आपण सकारात्मक  राहणे व त्यातही वैयक्तिक दुःखाने खचून न जाता मनाची उभारी धरुन जमेल तसं सामाजिक कार्यात काका नेहमीच हातभार लावत असतात. त्यांच्या सौभाग्यवती पण नेहमी राम मंदिरात श्रीविष्णूसहस्रनाम उपासनेला आवर्जून येत असत. आपल्या प्रिय व्यक्तीला जे प्रिय होते तेच जर आपण अंशतः करु शकलो तर आपल्या मनाला अधिक समाधान लाभते. कारण आपली प्रिय व्यक्ती जी आपल्या मनात असते

या व्‍यक्‍तींची संगत अजिबात करु नये." By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
या व्‍यक्‍तींची संगत अजिबात करु नये." १)आळशी लोक. आळशी लोकांकडून कोणत्‍याही कामाची अपेक्षा करणे हेच मुळात अपयशाकडे टाकलेले पहिले पाऊल असते. आपल्‍या आसपास एखादा आळशी व्‍यक्‍ती असेल तर तोही योग्‍यरित्‍या काम करत नाही आणि आपल्‍यालाही करु देत नाही. उलट त्‍याच्‍यामुळे आपला बहुमुल्‍य वेळ वाया जातो आणि आपल्‍या लक्ष्‍यापासून आपण आणखी दूर जातो. २)व्‍यर्थ बडबड करणारे लोक. अनेकांना बिन महत्‍त्‍वाची आणि व्‍यर्थ बडबड करण्‍याची सवय असते. असे लोक आपल्‍या कामामध्‍ये अडथळा बनतात आणि आपला वेळ वाया घालवतात. असे लोक आसपास असेल तर वेळेत काम होण्‍याची फार कमी शक्‍यता असते. त्‍यामुळे अशा लोकांपासून दूर रहावे. ३)नकारात्‍मक विचारांचे लोक. भित्रे लोक कोणत्‍याही कामाला सुरुवात करण्‍यापूर्वीच त्‍याविषयी नकारात्‍मक विचार करतात. असे लोक स्‍वत:ही पुढे जात नाही आणि दुस-यांनाही मदत करत नाही. अशा लोकांच्‍या आजुबाजूला राहिल्‍याने आपलेही विचार नकारात्‍मक बनण्‍याची शक्‍यता असते. यामुळे आपलाही आपल्‍या कामातील विश्‍वास उडण्‍याचा धोका असतो. त्‍यामुळे अशा लोकांपासून जेवढे अंतर ठेवता येईल तेवढे चांगले. ४)दिखावा करणारे लोक

सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  आलो एकटे जाणार एकटे मग जगायचं कुणासाठी? माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो पण आयुष्य का जगतो? कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी  ८०/९० वर्षांचे आयुष्य जगायचा, आता ५०/६० वर्षे जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं, आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त १५/२० दिवसांपुरतीच असते. कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं. मग...जगावं तरी कुणासाठी?  तर जगावं तर ते समाजासाठी तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवस

सुखासाठी साधनांची नाही तर समाधानाची गरज असते. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  You Tube https://youtube.com/channel/UCCsIB5Pme7rMS2ZL-nhaNQw ठेविले अनंते तैसैची रहावे,चित्ती असावे समाधान! सध्याच्या कालखंडात जे काही आजुबाजुला घडतंय त्याला अनुसरून!!! जेवढं तुमच्याकडे असूनही तुम्ही दुःखी आहात तेवढं कुणाकडे नसूनही ते सुखी आहेत. न मिळालेल्या गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगणे म्हणजेच खरे आयुष्य होय.  सुखासाठी साधनांची नाही तर समाधानाची गरज असते. परमेश्वराचे आभार माना आणि आनंदाने जगा.             हे जग  असंच आहे. ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळत  नाही आणि ज्याच्याकडे जे आहे त्याला त्याची किंमत नाही. मेलेल्या  माणसासमोर रडणारे बरेच असतात पण तोच माणूस जिवंत असताना समजून घेणारे कुणीच नसतात.           एक गोष्ट लक्षात ठेवा . जिथे तुमच्या मौनाची दखल घेतली जात नाही तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ  नसतो. चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसाकडून  अपेक्षा दोन्ही व्यर्थच! समस्या असणं ही खरी समस्या नाही  तर समस्ये बाबतचा तुमचा दृष्टिकोन हीच खरी समस्या आहे. आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात ज

पक्ष्यांपासून By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  🦜१. ते रात्री काही खात नाहीत.  🦜२. रात्री फिरत नाहीत  🦜३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत.   🦜४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत.  तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात, बरोबर घेऊन  जात नाहीत..!!   🦜५. अंधार पडल्यावर झोपून जातात, आणि पाहाटेच उठून, गाणी गात उठतात.   🦜६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.   🦜७. आपल्या जातीतच विवाह करतात (एकत्र राहतात) बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.  🦜८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात, ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत.   🦜९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.  🦜१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.  🦜११. आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.  🦜१२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.   🦜१३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात. खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..??!! त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल. संकलन : ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंद

गरुड पुराणामध्ये असे १० काम ठरतात पाप. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
🔴१)पहिले पाप सामान्यतः स्त्रीचा अपमान कधीच करू नये, परंतु गरोदर किंवा मासिक धर्म दरम्यान स्त्रीला वाईट बोलणे महापाप आहे. अशा व्यक्तीला महादेव आणि देवता माफ करत नाहीत. 🔴२)दुसरे पाप इतरांचे धन प्राप्त करण्याची इच्छा ठेवणे, हेसुद्धा शास्त्रानुसार पाप आहे. 🔴३)तिसरे पाप एखाद्या सध्या-सरळ व्यक्तीला किंवा जीवाला कष्ट देणे, नुकसान पोहोचवणे त्यांच्यासाठी बाधा निर्माण करणे हेसुद्धा महापाप आहे. 🔴४)चौथे पाप चांगले-वाईट, चूक-बरोबर जाणून घेतल्यानंतरही चुकीचे काम करणे महापाप आहे. 🔴५)पाचवे पाप इतरांच्या पती किंवा पत्नीवर वाईट नजर ठेवणे किंवा त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेसुद्धा महापाप आहे. 🔴६)सहावे पाप इतरांचा मान-सन्मान कमी करण्याच्या इच्छेने खोटे बोलणे, छळ-कपट करणे, षडयंत्र रचणे महापाप आहे 🔴७)सातवे पाप लहान मुलं, महिला किंवा कोणत्याही कमजोर व्यक्तीची हिंसा करणे, असामाजिक कर्म करणे महापाप आहे. 🔴८)आठवे पाप एखाद्या मंदिरातील वस्तू चोरणे किंवा चुकीच्या पद्धतीने इतरांची संपत्ती हडपणे महापाप आहे. 🔴९)नववे पाप गुरु, आई-वडील, पत्नी किंवा पूर्वजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला महादेव कधीही माफ करत

संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
 कोणी लिहिलं आहे माहीत नाही मात्र अगदी खरं आणि उत्तम लिहिलं आहे. जरूर वाचा         👅👅 *जीभ* 👅👅 1. ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे *जीभ !* 2. रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे *जीभ*  3. एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे *जीभ* 4. सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव *जीभ !*  5. तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये  ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे *जीभ.* 6. प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी *जीभ,* 7. भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही  सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंद

मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
🔴१.) प्रश्न : –  आत्मा जेव्हा शरिर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरिर सोङले आहे म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते काय ?      असे म्हणतात त्यांना खुप वेगवेगळे प्रवास असतात, त्यामधे आपण सारखे आठवण काढत राहीलो तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो ?   🔴कृपया नक्की काय असते ? 🔴उत्तर :- प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे. यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडताच आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो तेंव्हा या देहाला मरण येते. आत्मा अजरामर आहे. देहा भोवतीच हा आत्मा घुटमळत असतो, घरात रडारड सुरु होते, शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करतात, आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी म्हणतात. अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ . अंतेष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हंटले जातात त्याचा अर्थ असा आहे की , मेलेल्या व्यक्तिला संबोधुन मंत्र आहेत, कारण आत्मा तिथे हजर असतो व तो हे सर्व पहात असतो. तेंव्हा त्या मंत्राचा आशय असा आहे की आता तुमचा या दे

महाभारताचे "नऊ सार सूत्र". By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  🔴 १) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल"  - कौरव. 🔴२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील." - कर्ण. 🔴 ३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल." - अश्वत्थामा.  🔴४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." - भीष्म पितामह.  🔴५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" - दुर्योधन.  🔴६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते." - धृतराष्ट्र.  🔴७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे."  - अर्जुन.  🔴८) "प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही." - शकुनी.  🔴९) "नीति, धर्म आणि नियत