पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुकोबांनी देव म्हणजे काय हे सांगितले आहे. By-Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
तुकोबांनी देव म्हणजे काय हे सांगितले आहे. By-Nilesh Konde-Deshmukh. तुकोबा म्हणतात, देव आहे देव आहे । जवळी आह्मां अंतरबाहे ।। यात तुकोबांनी देव आहे असा स्पष्ट निर्वाळा दिला होता आणि तो कुठे आहे या विषयी काही संदेहही उरू दिला नव्हता. त्यांनी त्या दिवशी विवरूनही सांगितले होते की – देव आम्हां जवळी आहे! अंतरबाहे जवळी आहे! देव अंतरी आहे, देव बाहेरही आहे. अंतरात आहे तो देव आहे, बाहेर आहे तो ही देव आहे.  गोडीपणे जैसा गुळ । तैसा देव झाला सकळ ।। आता भजो कवणे परी । देव सबाह्य अंतरी ।। उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ।। हेम अळंकारा नामी । तुका ह्मणे तैसे आम्ही ।। यात तुकोबांनी प्रतिमा वापरून विषय अजून सोपा केलाय. गुळ आणि गोडी, पाणी आणि त्यावरील तरंग, सोन्याचे अलंकार आणि सोने ह्यांत वेगळे काही काढता येईल का असे विचारून ते म्हणतात तसाच देव सबाह्य अंतरी म्हणजेच सर्वत्र आहे. तो वेगळा काढून दाखविता येणार नाही.” तुकोबा म्हणतात सोन्याचा जसा छानसा अलंकार होतो तसे त्या जीवाचे म्हणजेच देवाचे आपण बनलेले आहोत. आपल्यापासून देव वेगळा काढता येणारच नाही. इतकेच नव्हे तर पाहा, ते ह्या अभंगात म्हणतात, जेव्हा माझा जी

तुळशीचे लग्न. By-Nilesh Konde-Deshmukh

तुळशीचे लग्न. By-Nilesh Konde-Deshmukh. तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती. पुढे, देव व दैत्य यांच्यांत युध्द होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली. विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली. इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्

शिवाजी महाराजांबद्दल इतरांची काही मते. By-Nilesh Konde-Deshmukh

  शिवाजी महाराजांबद्दल इतरांची काही मते. By-Nilesh Konde-Deshmukh.   "जर  शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"            - लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड. "भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे,  शिवाजी महाराजांप्रमाणे लढा !         - नेताजी सुभाषचंद्र बोस. "नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या  शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे !"                    - अॅडॉल्फ हिटलर "शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर  शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"                  - स्वामी विवेकानंद. "जर  शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !"               - बराक ओबामा, अमेरिका. "जर  शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"  

तेहतीस कोटी देव कोणते ? By-Nilesh Konde-Deshmukh.

तेहतीस कोटी देव कोणते ? By-Nilesh Konde-Deshmukh. उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटि' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो  पण ,  येथे कोटि शब्दाची, 'टि' पहिली वेलांटी आहे.   मुळात संस्कृतमधील  "कोटि"  या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार'  असा आहे.  ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत.  त्यांच्यात ,  ८ वसू,  ११ रूद्र,  १२ आदीत्य,  १ इंद्र १ प्रजापती  असे पाच स्तर आहेत . प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे. अष्टवसूंची नावे -  आप, धृव, सोम, धर, अनिल,  अनल, प्रत्यूष आणि प्रभास .  अकरा रूद्रांची नावे -  मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज. बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू १ इंद्र आणि १ प्रजापती असे एकंदर  ८+११+१२+१+१ = ३३... जेणेकरून '३३ कोटि' चा चुकीचा अर्थ लावणे बंद होईल. Email Id :  nil.konde26@gmail.com Mob.No.9890013520.

' हिंदू ' शब्द किती जुना? By-Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
' हिंदू ' शब्द किती जुना?  By-Nilesh Konde-Deshmukh.                              सोशल  मिडीयावरील  एका पोस्टम्ध्ये  असे म्हटले होते की, ' हिंदू ' हा शब्द  मुसलमानांनी प्रचलित केला.त्यासाठी जो संदर्भ दिला  होता  त्याबाबत योग्य तो खुलासा नंतर करतो.सर्वसाधारणपणे  ' हिंदू ' शब्द  ' सिंधू ' ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे.  पण हिंदू ' हा शब्द कसा प्रचलित झाला  आणि ऐतिहासिक दृष्ट्या तो किती प्राचिन आहे याचा  उपलब्ध साधन सामुग्रीचे आधारे  धांडोळा घेतला तर  असे दिसून येते की तो श्ब्द पर्शियन लोकांनी  प्रथम वापरला आणि प्रचलित  केला.पर्शियन लोकांना' स' उच्चार करता येत नव्हता त्यामुळे  त्यांनी  सिंधू ' ऐवजी  ' हिंदू ' असे चूकीचे उच्चारण केले.प्राचिन पर्शियन Cuneiform Inscription आणि  त्यांचा धर्मग्रंथ  ' Zend Avesta ' ह्यात हिंदू शब्दाचा उल्लेख  आहे.त्यात आलेला  ' हिंदू ' हा शब्द  धर्म ह्या संदर्भात नसून तो तत्कालिन भारत उपखंडाचे जे भौगोलिक  स्थान  होते त्या अर्थाने  आलेला  आहे.                          

वारी हे साध्य नसून वारी हे एक साधन आहे. By-Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
वारी हे साध्य नसून वारी हे एक साधन आहे. By-Nilesh Konde-Deshmukh. आषाढी कार्तिकी विसरू नका मज ! सांगतसे गुज पांडुरंग !! - संत नामदेव महाराज वारी म्हणजे थोडक्यात वारंवार. सतत फेऱ्या मारणे म्हणजे वारी होय. वारकरी हा श्री क्षेत्र पंढरपूर ला पांडुरंगाच्या दर्शनासाठी फेय्रा मारतो म्हणजेच ‘पंढरीची वारी’ करतो. भौतिकातून अभौतिकात, लौकिकातून अलौकिकात, बहिरंगातून अंतरंगात, स्वार्थातून परमार्थात व देहभावातून देवभावात लीन-विलीन होण्यासाठी जी, आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी-कार्तिकी पायी यात्रा होते तिला भागवतधर्मामध्ये ‘वारी’ असे म्हणतात. वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर अशी केवळ पदयात्रा, असे काहींना वाटतही असेल. परंतु केवळ वार्षिक नियमित पदयात्रा करणे हा झाला लौकिक किंवा बाह्यांगाचा भाग. वारी म्हणजे सातत्य, निरंतरता, अखंड करावयाची साधना ! तपस्या-साधना अनेक प्रकारांनी करता येते. ध्यानधारणा, योगसाधना, जपतपादी अनुष्ठान, मौनव्रत असे विविध मार्ग तपस्येचे असतात. ‘पंढरीची वारी’ ही सुद्धा एक, दिसायला सोपी व सुलभ जरी असली तरी प्रत्यक्षात आचरण्याला फार कठीण अशी ‘उग्रकठोर तपस्याच’ आहे. वारी म्हणजे फेरा

ज्ञानेश्वर महाराज अभंग. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
https://www.facebook.com/nileshkondedeshmuk/ मो.नं. ९८९००१३५२० 🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱 कर्पूर अग्नीसी स्वदेहा नाशी ।  चंदनी मासी न थरे देखा ॥१॥ घ्राणाची कळिका भ्रमर रूंजीका ।  तेथील झुळुका रूंजी करी ॥२॥  मोतियाचा चारा राजहंसा सैरा ।  दुजिया पाखिरा कामा नये ॥३॥  ज्ञानदेव म्हणे घेती ते शाहाणे ।  येर ते पाहुणे यमाचे रया ॥४ 🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱 🚩भावपराग🚩 🔱कापूर सुगंधी असतो पण त्याचा अग्निसी संबंध पावला तर नाश होतो.चंदन सुगंधी असतो व तोच अग्निसी संबंध पावला तर त्याच्यावर मांसी बसत नाही. 🔱कमलनी भ्रमरूला आपल्या सुगंधाने गुंजारवीत असते व त्या सुगंधाच्या झुळकेने तो फुलांभोवती गुंजारव करत असतो.परंतु नाक हेच जर फूल झाले तर त्यांत येणाऱ्या सुगंधाच्या झुळकेस रंजणारे म्हणजे सुख पावणारे घ्राणेंद्रिय हेच आहे. 🔱मोत्यांच्या चाऱ्यांची गोडी एका राजहंसालाच कळते दुसऱ्याला ती चव कळणार नाही. 🔱मनुष्य देहांत आत्मरूपाने ब्रह्मवास करीत आहे.त्या ब्रह्मस्वरूपाला जो जाणेल तोच खरा शहाणा.त्याला जो जाणणार नाही असा मूर्ख मनुष्य जन्म मृत्युच्या फेऱ्यात पडतो. म्हणून परमात्मस्वरूपाला यथार्थ ओळखणे हेच मनुष्यांचे आद्य

रहस्यमय जगन्नाथ पुरी. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
©®✍ रहस्यमय जगन्नाथ पुरी. By-Nilesh Konde-Deshmukh. जगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले  रहस्य आणि भक्तांची श्रद्धा:-      जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा पारध्याचा बाण लागून मृत्यू झाला तेव्हा पांडवांनी त्यांचे शरीर शोधून त्याचा दाहसंस्कार केला. इतर सर्व शरीर जळून गेले पण हृदय जळतच राहिले. नंतर तो पिंड नदीच्या पाण्यात सोडण्यात आला. त्या पिंडाचा त्या जळत्या हृदयामुळे एक लगदा तयार झाला. राजा इंद्रद्युम्न याला तो लगदा मिळाला, त्याने तो लगदा भगवान जगन्नाथाची मूर्ती तयार करून त्यात ठेवला आणि मंदिरात स्थापन केला.  दर १२ वर्षांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती बदलली जाते, परंतु मूर्तीच्या आतील तो लगदा आजपर्यंत कोणीही पहिला नाही. जे पुजारी मूर्ती बदलतात त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि हात सुद्धा कापडाने गुंडाळले जातात. त्यामुळे आजपर्यंत कोणीही त्या लगद्याला पाहू शकला नाही किंवा त्याचा स्पर्श अनुभवू शकला नाही!  असे म्हटले जाते कि भगवंताच्या हृदयाच्या लगद्याला जो कोणी पहिल त्याचा  तात्काळ  मृत्

मायबापे केवळ काशी. By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
©®✍मायबापे केवळ काशी. By- Nilesh Konde-Deshmukh तुम्हाला हे माहिती आहे का ? विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या आयुष्यातील एक भयानक वस्तुस्थिती. ती मुलांना जन्म दिला की तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लाना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते. ••◆ विंचु ◆•• विंचवा विषयी आपल्याला काय माहित आहे? विंचु डंख मारतो, इतकच ना? तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे. विंचवाची मादी विंचवी म्हणुयात तिला. श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला भेटलच पाहिजे. विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी.काही तासांनी पिलांना भुक लागते,निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी. तिला पिलांच पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही. कासवा विषयी आपल्याला माहित असेलच; कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांच पोट भरतं. ईथे त्याहुनही गंभीर समस्या आहे. विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही. आता हळुहळु पिलांची भुक अनावर होऊ लागते. विंचवी बिचारी कासाविस होते, पण द्यायला तर काहीच नाही. पिलं तिला चावा घ्यायला सुरुवात करतात ती

कर भला तो हो भला. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
©®✍  कर  भला तो हो भला. By-Nilesh Konde-Deshmukh        आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असतो. तो पर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही....!!        जो पर्यंत बिभीषण लंके मध्ये राहत होते तो पर्यंत रावणाने पाप केले पण बिभीषणचे पुण्य कारणास्तव रावन सुखी होता....!!        परंतु जेव्हा बिभीषण सारख्या भगवंत वत्सल भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाणेस सांगितले.. तेव्हापासून रावणाची विनाश होण्यास  सुरूवात झाली आणि शेवटी  रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही....!!        असेच या प्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदूर सारखे भक्त राहत होते तो पर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले.. पण जेव्हा कौरवांनी विदूरचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुरला सांगितले की काका आपण तिर्थ यात्रेला जावे, जसे विदुरने हस्तिनापूर सोडले,कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेल व ककौरवांचे मागे कोणीही वारस राहिले नाही....!!        याप्रकारे आपल्या परीवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुन्यवान आत्मा राहतो. तो पर्

श्री ज्ञानेश्वरी. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
मो.नं.९८९००१३५२० ॥ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥      ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥             । संन्यासयोगः । अर्जुन उवाचः संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यत् श्रेयं एतयोरेकें तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥ भावार्थ :- अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा , कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुनः कर्माचे अनुष्ठान करावे असेंहि तूच सांगतोस. या दोन्हीपैकी ( तुझ्या मताने) जे खरोखर श्रेयस्कर असेल ते एक मला निश्चित सांग. मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचे बोलणें । एक होय तरी अंतःकरणे । विचारूं ये ॥ १ ॥ मग अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, "अहो ! हे असे कसे तुमचे बोलणे ? तुम्ही एकच मार्ग सांगाल , तर त्यासंबंधी मनाने कांही विचार करता येईल... मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु । तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ॥ २ ॥ यापूर्वी तुम्ही कर्माचा त्याग करावा , हे विविध प्रकारे सांगितले होते; परंतु आता कर्मयोग आचरणासाठी अधिक उत्तेजन का देता ? ऐसें द्व्यर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांचिया चित्ता । आपुलिये चाडे अनंता । उमजू

काट्याच्या अणीवर वसले तीन गाव. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
       काट्याच्या अणीवर वसले तीन गाव काट्याच्या अणीवर वसले तीन गाव । दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥ वसेचिना तिथे आले तीन कुंभार । दोन थोटे एका घडेचिना ॥२॥ घडेचिना त्याने घडली तीन मडकी । दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥ भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग । दोन हिरवे एक शिजेचिना ॥४॥ शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे । दोन रुसले एक जेवेचिना ॥५॥ जेवेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या। दोन हुकल्या एक लागेचिना ॥६॥ ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव । सद्‌गुरूवाचुनि कळेचिना ॥७॥ ज्ञानदेवांचे हे भारुढ [बहुरुढ] आध्यात्मिक छटा असलेले आहे. काळ नावाच्या काट्यावर स्थूल , सूक्ष्म व लिंगदेह ही तीन गावे वसवली. स्थूल व सूक्ष्म हे देह नाशवंत म्हणून ओसाड. लिंगदेह हा अदृष्य अनाकलनीय म्हणून वसेचिना. तीन कुंभार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर. पण विष्णू आणि महेश्वर हे निर्मिती बाबत तटस्थ. एक कुंभार ब्रह्मा याचे कडे निर्मिती, पण तो वसवतो ते आत्मतत्व. याच आधारावर जो त्याचाच आधार आहे. त्याने घडवलेली तीन मडकी. म्हणजे स्थूल सूक्ष्म देह नाश पावणारी कच्ची मडकी. या लिंगदेहात अविनाशी आत्मतत्व. यावर अग्नीचा परिणाम नाही म्हणून भाजण्याचा प्

प्रकृतीचे तीन कडक नियम. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
‼प्रकृतीचे तीन कडक नियम जे सत्य आहे.‼ 1. प्रकृतिचा पहिला नियम. सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती घासगवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी बुद्धीत सकारात्मक विचार  भरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप तयार होतात.    2. प्रकृतिचा दूसरा  नियम. ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो. सुखी सुख वाटतो. दुःखी दुःख वाटतो. ज्ञानी ज्ञान वाटतो. भ्रमित करणारा भ्रम वाटतो. घाबरणारा भय वाटतो.   3. प्रकृतिचा तिसरा नियम. आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका. कारण भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात. पैसा पचला नाही तर देखावा वाढतो. बातचित पचली नाही तर  चुगली वाढते. प्रशंसा पचली नाही तर अंहकार वाढतो. टिका पचली नाही तर दुश्मनी वाढते. गोपनीयता टिकली नाहीतर खतरा वाढतो. दुःख पचले नाहीतर  निराशा वाढते. आणि सुख पचले नाही तर  पाप वाढते. nil.konde26@gmail.com Whatsapp 9890013520

शिवरायांचे विवाह. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
#शिवरायांचे विवाह :- शिवरायांनी जे आठ विवाह केले ते हौस मौज मजा करण्यासाठी नाही.तर,प्रत्येक विवाहापाठीमागे एक तर शहाजी राजेंचा एक तर जिजाऊ आऊ साहेबांचा नाहीतर शिवरायांचा काही ना काही तरी राजकीय डावपेच होताच.' स्थितप्रज्ञ ' असा राजा ' श्रीमानयोगी ' कोणत्याही स्थितीत स्वराज्य स्वराज्य हे एकच ध्येय. 1) सगुणाबाईसाहेब :-        शिवरायांचा पहीला विवाह बंगळूर मुक्कामी दिनांक 16 एप्रिल 1640(शके 1552 विक्रमनाम  संवत्सर वैशाखमासी शुक्ल पंचमी)रोजी शिर्के यांचे कन्येशी शहाजीराजेंच्या आज्ञेप्रमाणे झाला.शिर्के घराणे हे उत्तर कोकणातील निजामशाही मुलुखातील होते.अंबा नदी ते सावित्री नदी ह्यामधील सह्याद्री लगतच्या भुभागास 'शिरठाण' म्हणुन ओळखला जातो.हेच राजे शिर्के निजामशाहीच्या पतनानंतर शहाजीराजेंच्या पदरी होते.यांचीच कन्यका शहाजीराजेंनी सुन म्हणुन करुन घेतली. जन्म-1633 मृत्यू-1670 2) सईबाईसाहेब -   शिवरायांचा दुसरा विवाह मुधोजी निंबाळकर यांची कनिष्ठ कन्या राजसबाई उर्फ सईबाई यांच्या बरोबर सन 1641 ह्या वर्षी झाला.सईबाईंचे वय यावेळी 7 वर्षाचे होते.हा विवाह विजापुरी मोठ्य

दिप पुजन. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
--------------- दीप पूजन --------------- शुभं करोति कल्याणं,  आरोग्यं धन संपदा शत्रू बुद्धि विनाशाय,  दीपं ज्योति नमोस्तुते।। या मंत्राचा सोपा आणि सरळ अर्थ : शुभ आणि कल्याण करणा-या आरोग्य आणि धनसंपदा देणा-या, शत्रू बुद्धीचा नाश करणा-या आणि शत्रूवर विजय प्राप्त करू देणा-या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो.  प्रत्येक पूजन कर्मामध्ये दिवा लावणे अनिवार्य प्रथा आहे. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो. दिवा लावून आरती केली जाते. त्यानंतर पूजा पूर्ण होते.  *दिवा लावताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.* १) तेलाचा दिवा कोठे ठेवावा : पूजा करताना देवी-देवतांसमोर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा. २) पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विझणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे. दिवा विझल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. ३)दिव्यासाठी कोणत्या वातीचा उपयोग करावा :  तुपाच्या दिव्यासाठी पांढ-या रूईच्या वातीचा उपयोग करावा. याउलट तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीचा उपयोग करणे जास्त शुभ राहते. ४) दिवा लावताना वरील मंत्राचा उच्चार अवश्य करावा. ५) पूजेम

समुद्रमंथन. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
----------------- समुद्रमंथन ----------------- समुद्रमंथनाची कथा महाभारतामध्ये समुद्रमंथनाची कथा आली आहे.  ती तेथे जनमेजय राजाने वैशंपायन ऋषींना सांगितली आहे.  ही कथा 'अमृतमंथन' या नावाने इंडोनेशियातल्या जावा बेटात लिहिल्या गेलेल्या 'हरिविजय' या काव्यग्रंथात आणि भागवत पुराणातल्या अष्टम स्कंधातील सातव्या अध्यायात आहे. ही कथा खालीलप्रमाणे. मेरू नावाच्या एका तेजस्वी पर्वताच्या एका शिखरावर देवतागण एकत्र होऊन अमृतप्राप्तीसाठी चर्चा करत होते. तेव्हा भगवान नारायणांनी देवांना सांगितले," देवांनी आणि दैत्यांनी (दानवांनी) समुद्रमंथन करावे, त्या मंथनातून अमृतप्राप्ती होईल. " तेव्हा देवांनी नारायणांच्या सल्ल्यानुसार अकरा सहस्र योजने उंच आणि खोल असलेला मंदार पर्वत उपटून काढण्याचा प्रयत्‍न केला, पण ते शक्य झाले नाही. तेव्हा देवगण परत भगवान नारायण आणि भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. आणि तेव्हा त्यांनी शेषनागाला मंदाराचल उपटण्यासाठी सांगितले. महाबली शेषनागाने मंदाराचल उपटला. सर्व देवगण मंदाराचलासह समुद्रकिनारी गेले. समुद्रकिनारी गेल्यावर त्यांनी समुद्रदेवाला सांगितले की,

तुळशी विवाह. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
🔶 तुळशी विवाहामागील अर्थ 🔶 तुळशीचे एक पान देवाच्या समकक्ष बसण्याचे सामर्थ्य ठेवते. तुळशी म्हणजेच 'तुलां सादृश्यंस्यति नाशयती इति तुलसी।' देवाला पूर्णपणे वरण्याची क्षमता राधा, सत्यभामा, रूक्मणी व सोळा हजार पट्टराण्यांमध्येही नाही.  देवाला वरण्यासाठी जो पवित्र गंध व श्रध्दा, सात्विक एकांत हवा तो तुळशीत आहे. तुळशी विवाहाचा अर्थ विश्वव्यापी सत्तेला वृक्षातील चेतनेची करूण हाक असा होतो. या विवाहामागचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे. हा विवाह पृथ्वीचे सुख-समृध्दी भरपूर पाऊस व चांगले पीक या सोबतच लोककल्याणाची आस या गोष्टींचे प्रतीक आहे.  आषाढीला झोपलेले देव जेव्हा जागे होतात, त्यावेळी हरीवल्लभा तुळशी त्यांची प्रार्थना ऐकते. तुळशी विवाह देव जागे होण्याच्या काळातील पवित्र सोहळा मानला जातो. तुळशी विवाह संपूर्ण वैष्णवी चेतनेद्वारा पाहिलेले एक महास्वप्न आहे, ज्यात देव स्वत: खाली उतरतात व या पृथ्वीतलावर अणूरेणूंना तेजाने प्रकाशमय करतात. तुळशी विवाहाचा सरळ अर्थ तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन करणे असा होतो. तुळशीला केलेली प्रार्थना देवांपर्यंत पोहोचते. यामुळे तुळशीला सामान्या

आपल्या घरात जर मुंग्या आढळुन येत असतील तर आयुष्यात होणाऱ्या या घटनाबद्दल देतात संकेत, या संकेतांना दुर्लक्ष करणे पडु शकते महागात. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
आपल्या घरात जर मुंग्या आढळुन येत असतील तर आयुष्यात होणाऱ्या या घटनाबद्दल देतात संकेत, या संकेतांना दुर्लक्ष करणे पडु शकते महागात. आपल्या रुढींच्या मान्यते प्रमाणे घरात कोणत्याही, पशुचे विवरण हे वेगवेगळी क्रिया दर्शवत असतात. तसेच अनेक लोकांच्या घरात अचानक मुंग्या निघतात आणि लाख प्रयत्ना नंतरही त्या बंद होत नाहीत. शास्त्रानुसार घरात मुंग्या निघणे, भविष्यात होणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांचे संकेत असते. त्यामुळे जेव्हा घरात मुंग्या निघतात तेव्हा त्यांना नजर अंदाज किंवा निष्काळजीपणा करू नये. घरातील कोणत्याही कोपर्‍यातून मुंग्या निघतात आणि या कोणत्याही दिशेने जात असतात, याच्या मदतीने भविष्यात काय होणार आहे, याविषयी माहिती मिळू शकते. याशिवाय लाल रंगांच्या मुंग्या घरातून निघत असतात, याच्या मदतीने भविष्यात होणाऱ्या घटनांचे संकेत मिळतात, तर जाणून घेऊया मुंग्यां विषयी जोडलेल्या या संकेतांविषयी. लाल मुंग्यांची जोडलेले संकेत :- जर तुमच्या घरातून कोणत्याही कोपर्‍यातून ,लाल रंगांच्या मुंग्या निघत असतील, तर सावधान व्हा ! कारण लाल रंगांच्या मुंग्या अशुभ मानल्या जातात. लाल रंगांच्या मुंग्या निघण

का साजरी करतात दिवाळी? जाणून घ्या धनत्रोदशी, नरकतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचे महत्त्व. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
का साजरी करतात दिवाळी? जाणून घ्या धनत्रोदशी, नरकतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचे महत्त्व. दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बव्हंश ठिकाणी सुटी असते. उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचि

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! महिलांना दागिने घालायला खूप आवडतात. विशेषत: विवाहित महिलांना शृंगार करून राहायला खूप आवडते. यामध्ये पायाच्या जोडवीचा देखील समावेश असतो. या पायाच्या जोडवीला महिलांचा अंतिम शृंगार मानला जातो. तुमच्या लक्षात आले असेलच की जोडवी ही फक्त चांदीचीच घालतात, सोन्याची जोडवी कोणी नाही घालत. यामागे एक ठोस कारण देखील आहे. शगुन शास्त्रानुसार सोन्याचे सापडणे व सोने हरवणे हे दोन्हीही अशुभ मानले जाते. उदाहरणार्थ जर रस्त्याने चालताना तुम्हाला सोन्याची एखादी वस्तू मिळाली तर याचा तुमच्या नवऱ्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. अशाच प्रकारे सोन्याला बघणे देखील नवऱ्याच्या दरिद्रता आणि दुर्भाग्यता दर्शवते. सोने हे गुरु ग्रहाचा प्रभाव वाढवते व कमी देखील करते. यामुळे पायात चांदीची जोडवीच घातली जाते. विवाहित महिलांनी घातली पाहिजे जोडवी – शास्त्रानुसार प्रत्येक विवाहित महिलांचे जोडवी घालणे आवश्यक असते. या जोडवींना महिलांच्या शृंगाराचे अंतिम आभूषण मानले जाते. विशेष म्हणजे की महिलांचा सर्व शृंगार हा मांग, टिळा आणि पायां

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
जपमाळ माहिती ========== जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. जप करण्याची पद्धत ————————— शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा. गोमुखीने केलेला जप : उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ठ बाधांपासून मुक्ती मिळते. अंगठयाच्या सहाय्याने जप : मोक्ष प्राप्ती होते. तर्जनीने जप : शत्रुनाश होतो. मध्यमेने जप : धनप्राप्ती होते. अनामिकेने जप : शांतीप्राप्त होते. करांगुलीने जप : सुंदरताप्राप्ती होते. जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये, जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरूमण्याकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत : मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठयाने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे , या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ

धर्म म्हणजे काय ? By-Nilesh Konde-Deshmukh

धर्म म्हणजे काय ? एकीकडे ‘धर्माविना तरणोपाय नाही’, तर दुसरीकडे ‘धर्म म्हणजे अफूची गोळी आहे’, अशी आत्यंतिक विरोधी वचने ऐकून वा वाचून सर्वसामान्य व्यक्तीचा गोंधळ उडतो. तसेच धर्म म्हटले की, बहुतेकांना हिंदु, मुसलमान, खिश्चन, बौद्ध इत्यादी शब्द आठवतात, तर काही जणांना भारतात निधर्मी राज्य असल्याची आठवण होते. त्यामुळे धर्म म्हणजे एक अस्पृश्य विषय असे त्यांना वाटते. प्रस्तूत लेखात नेमक्या याच प्रश्नावर अर्थात् ‘धर्म म्हणजे काय ?’ यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.   धर्म : व्युत्पत्ती, व्याख्या आणि अर्थ श्री शंकराचार्यांनी धर्माची पुढीलप्रमाणे व्याख्या केली आहे – `समाजव्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणे, या गोष्टी ज्याच्यामुळे साध्य होतात तो धर्म.’ १. ‘धर्म’ म्हणजे `रिलिजन’ नव्हे ! इंग्रजी भाषेत धर्माला योग्य असा शब्दच नाही. रिलिजन (Religion)’ हा शब्द ‘रेलिगेट् (Relegate)’ या क्रियापदावरून बनला आहे. ‘रेलिगेट्’ म्हणजे ‘खालच्या पायरीला पाठवणे’. ‘ज्यामुळे आपण खालच्या पायरीला जातो’, तो म्हणजे धर्म’, असा त्याचा अर्थ होईल; म्हणून हा शब्दच अयोग्य आहे. याउलट ‘धर्म’